Discover
ग्रंथप्रेमी - Granthpremi
71 Episodes
Reverse
परकीय आक्रमणे आणि मराठ्यांचा भीमटोला:
जेव्हा इराणचा क्रूरकर्मा नादिरशहा भारतावर चालून आला, तेव्हा दिल्ली रक्ताने माखली होती. अवघ्या तीन तासांत ३० हजार निष्पाप लोकांची कत्तल आणि मयूर सिंहासनासह कोट्यवधींची लूट घेऊन जाणारा हा 'मौत का सौदागर' नेमका कोण होता? नादिरशहाच्या या आक्रमणामागे निजामाची आणि सादत खानाची फितुरी कशी होती, याचा पर्दाफाश या भागात करण्यात आला आहे.
अशा कठीण काळात, जेव्हा मुघल साम्राज्य कोसळत होते, तेव्हा संपूर्ण हिंदुस्तानाची आशा केवळ बाजीराव पेशव्यांवर होती. सैन्य वसईत गुंतलेले असतानाही, बाजीरावांनी केवळ आपल्या नावाने नादिरशहाला रोखण्याचे 'धैर्य' कसे दाखवले? "परराज्य राहिले तरी सर्वांवरी आहे," ही बाजीरावांची राष्ट्रवादी भूमिका आणि त्यांनी नर्मदा-चंबळच्या पलिकडे शत्रूला रोखण्यासाठी आखलेली रणनीती श्री. काका विधाते यांनी अत्यंत ओघवत्या भाषेत मांडली आहे. भारताच्या इतिहासातील हा थरारक कालखंड समजून घेण्यासाठी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की ऐका.
मराठीत काही पुस्तकं 'बेस्ट-सेलर' ठरतात, तर काही काळाच्या पडद्याआड का जातात? मराठी साहित्य विश्वात नवीन लेखक तर येत आहेत, पण प्रकाशक आणि वितरणाचं काय? सोशल मीडियाच्या युगात एखादं पुस्तक 'बेस्ट सेलर' कसं ठरतं? 'ग्रंथप्रेमी पॉडकास्ट'च्या या भागात Book Influencers समीर गुधाटे आणि विनम्र भाबल यांनी मराठी पुस्तक उद्योगातील वास्तव मांडले आहे. केवळ पुस्तक लिहून चालत नाही, तर 'लेखक' म्हणून स्वतःला कसं प्रोजेक्ट करावे (Brand Building), यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला आहे. या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे:
* पुस्तकाचे मार्केटिंग: सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून पुस्तकं कशी विकावीत?
* संपादकाचे महत्त्व: लेखकाने संपादकाचा सल्ला का मानला पाहिजे?
* रिव्ह्यू आणि ब्लॉग्सचा विक्रीवर कसा परिणाम होतो?
* नवीन उपक्रम: 'बॉन्डिंग विथ बुक्स' सारख्या कल्पनांमुळे वाचक कसे जोडले जातात?
मराठी साहित्याला ग्लोबल बनवण्यासाठी लेखक आणि प्रकाशकांनी कोणती नवी धोरणे स्वीकारली पाहिजेत, हे जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा!
सामाजिक कार्यकर्त्या गीताली वि.म. यांच्यासोबतच्या संवादाचा हा दुसरा भाग. या भागात 'मिळून साऱ्या जणी'चा ४० वर्षांचा थक्क करणारा प्रवास आणि जागतिक नेटवर्कचा उलगडा केला आहे. त्यांनी विवाहसंस्था, घटस्फोट आणि समतेवर आधारित नात्यांविषयी अत्यंत धाडसी आणि पारदर्शक विचार मांडून समाजाच्या ढोंगीपणाला आरसा दाखवला आहे. केवळ स्त्रियांच्या प्रबोधनावर न थांबता, पुरुषांमधील 'विषारी मर्दानगी' बदलून त्यांना संवेदनशील बनवणे ही काळाची गरज असल्याचे त्या सांगतात. घरकाम ही केवळ स्त्रीची जबाबदारी नसून ती सर्वांची कशी आहे, यावर त्यांनी परखड भाष्य केले आहे. चळवळीचा पुढचा टप्पा म्हणून 'सामूहिक नेतृत्व' आणि 'मैत्रभावाची' संकल्पना त्यांनी मांडली आहे. स्वतःच्या बंडखोर स्वभावापासून ते फर्गुसन कॉलेजमधील अध्यापनापर्यंतचा त्यांचा वैयक्तिक प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. मानवी नात्यांकडे बघण्याचा एक नवा आणि सम्यक दृष्टिकोन देणारा हा विशेष भाग नक्की पहा!.
"Toxic masculinity doesn't just hurt women; it destroys men too". Geetali Vi. Ma. discusses why men need to embrace sensitivity and how "hero culture" is a trap. She breaks down her bold stand on marriage, divorce, her own journey, and why Indian men must enter the kitchen. Learn how we can raise a generation of empathetic humans in this conversation.
शिक्षण मिळालं, आर्थिक स्थैर्य आलं, तरीही सुखाच्या नावाखाली मुलींची घुसमट का? आजच्या काळात उच्चशिक्षित आणि स्वावलंबी मुली टोकाचं पाऊल का उचलत आहेत, या प्रश्नाचं अस्वस्थ करणारं उत्तर या भागात दडलंय. मिळून सार्याजणी या मासिकाच्या संपादक आणि कार्यकर्त्या डॉ. गीताली वि. म. यांच्याशी मारलेल्या या गप्पा निव्वळ संवाद नाहीत, तर ते आरसा दाखवणारं वास्तव आहे. लग्नानंतर मुलीचं होणारं 'आदिम विस्थापन' (Primordial Displacement) म्हणजे नेमकं काय? ज्या घरात आपलं नाव, ओळख आणि अस्तित्वच पुसलं जातं, तिथे 'सहजीवन' कसं फुलणार? लग्नासाठी वडिलांनी केलेल्या खर्चाचं ओझं, मुलीला 'सहन' करायला कसं भाग पाडतं, यावर गीताली ताईंनी अतिशय मार्मिक भाष्य केलं आहे.
या भागात तुम्ही काय पाहाल ?
* चळवळ म्हणजे स्त्री विरुद्ध पुरुष नव्हे ?
* स्त्री मृत्यूला सासरइतकंच 'माहेर' का जबाबदार असतं?
* 'मिळून साऱ्या जणी' हे मासिक नव्हे तर चळवळ.
* स्त्री चळवळीतून मिळालेलं आत्मभान आणि भविष्यातील आव्हाने.
* पुरुषांना सक्षमीकरणाची गरज काय?
हा व्हिडिओ प्रत्येक आई-वडिलांनी, मुलांनी आणि तरुण जोडप्याने आवर्जून पाहायला हवा. समाज बदलण्याची सुरुवात आपल्या स्वतःच्या घरापासून कशी करायची, हे समजून घेण्यासाठी हा एपिसोड नक्की पहा.
Most people think Feminism is about "Women vs. Men." They’re wrong. In this episode, Dr. Geetali Vi. Ma. explains why true equality requires a complete update of our societal mindset.
As a core leader of the iconic magazine "Milun Sarya Jani," Geetali Tai shares the journey of building a "Sakav" (Bridge) between rural struggles and urban aspirations. This isn't just about women's rights; it's about the "Maitrabhav" (Spirit of Friendship)—a gender-neutral approach to living that liberates both men and women from patriarchal traps.
Inside the Episode:
* The Inner Struggle: Why the fight for equality starts inside your own home (and your own head).
* Beyond Slogans: How to move from "Brotherhood" to a more inclusive "Human-hood."
* The Legacy of Vidya Bal: How a single magazine changed the lives of thousands of Marathi women.
Whether you're a student, a professional, or a homemaker, this episode provides a blueprint for building healthier, more equitable communities.
निरामय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टमार्फत चालवलं जात असलेलं 'मिळून साऱ्याजणी' हे मासिक वर्गणी भरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :
https://www.miloonsaryajani.in/subscribe
अथवा
सोमवार ते शुक्रवार, दुपारी १२ ते ५ या कार्यालयीन वेळेत ०२० - २५६५ ३९३८ किंवा ७४४७४४९६६४ या क्रमांकावर फोन करूनही कळवता येईल.
"लेखकाने आता influencer झाले पाहिजे.." - फिल्म इंडस्ट्री मध्ये पटकथाकार म्हणून काम करणारा सुमेध असे का म्हणाला? एखाद्या वेबसेरीजलाही मागे टाकतील अश्या महामाया निळावंती आणि अजातशत्रू या कादंबर्या लिहिणारा हा तरुण लेखक नेमका आहे कसा? त्याची creative process काय आहे? "निळावंती" कादंबरीची सुरुवात कशी झाली? निळावंतीला मिळालेले वाचकांचे प्रेम आणि गमतीदार किस्से.. पूर्ण वेळ लिखाण करून पैसा मिळू शकतो? हे आणि असे बरेच विषय आपल्याला ग्रंथप्रेमी पॉडकास्टच्या या एपिसोड मध्ये सुमेध कडून ऐकायला मिळतील.
"Writers must become influencers" - This statement hits different when it comes from someone who actually researched ancient Tibetan texts for 3 years. Sumedh's novels feel like Netflix series in book form, and in this episode he reveals his complete creative process, the blue hair mystery that sparked "Nilavanti," and why most aspiring writers are approaching the game COMPLETELY wrong!
सुमेधने लिहीलेल्या "महामाया निळावंती" आणि "अजातशत्रु" या दोन्ही कादंबर्या ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा : https://granthpremi.com/collections/books-by-sumedh
माऊलींचा हरिपाठ माहीत नाही असा मराठी माणूस महाराष्ट्रात विरळाच! संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ जरी कानाला गोड वाटला आणि समजायला वरवर सोपा वाटला तरी त्याचा अर्थ आणि तत्वज्ञान खोल आहे. माऊलींच्या हरिपाठातील "सात पाच तीन दशकांचा मेळा" आणि "नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ" हे अभंग आणि त्याचा गूढ अर्थ समजून घेवूया ग्रंथप्रेमी मराठी पॉडकास्ट च्या या विशेष एपिसोड मध्ये गोष्टीरूप हरिपाठ पुस्तकाचे लेखक, योग शिक्षक आणि कीर्तनकार श्री अनिल फडणवीस यांच्याकडून. नामजपाचे आणि हरिपाठाचे महत्व नेमके काय आणि तो संसारी माणसांना कसा उपयोगी आहे ही चर्चा आपण या भागात केले आहे. नचिकेत क्षिरे यांनी हा संवाद साधला आहे. रामनामाची गोडी वाढवायची असेल आणि हरिपाठ समजून घ्यायचा असेल तर हा एपिसोड चुकवू नका! राम कृष्ण हरी!
सगळं असूनही काहीतरी हरवल्यासारखं का वाटतं? नैराश्य का येतं? याचं उत्तर ७०० वर्षांपूर्वीच्या संत साहित्यात दडलेलं आहे. 'तैसी मुक्ताबाई आम्हांमधी' पुस्तकाच्या लेखिका डॉ. रूपाली शिंदे यांच्यासोबतचा संवाद या दुसर्या भागातही आपण चालू ठेवतोय.
डॉ. शिंदे सांगतात की संत साहित्य म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे, तर ते जगण्याचं बळ देणारं सत्व आहे. नरोटीची उपासना करण्यापेक्षा त्यातील खोबरं (तत्वज्ञान) जास्त महत्त्वाचं आहे. मुक्ताबाई, जनाबाई आणि बहिणाबाई या केवळ संतांच्या रांगेतल्या मूर्ती नाहीत, तर त्या आधुनिक स्त्रीच्या मनाचा 'आरसा' आहेत. या आरशात पाहताना आपल्याला कुठलाही मेक-अप किंवा मुखवटा लागत नाही. 'मुंगी उडाली आकाशी' सारख्या कूट रचनांमागे मागे दडलेला गूढ अर्थ आणि मुक्ताईंचे 'आदिमाया' रूप उलगडून दाखवणारा हा विशेष भाग जरूर पहा.
एपिसोडमधील महत्वाचे मुद्दे:
ताटीचे अभंग: स्वतःच लावलेली ताटी आधुनिक स्त्रीने किंवा पुरुषांनी कशी उघडायची ?
वसंत बापट ते बहिणाबाई या वेगवेगळ्या काळातील कवींनी मुक्ताईच्या 'योग सामर्थ्याला' कसे शब्दबद्ध केले आहे?
मुक्ताबाईंचे वारकरी संप्रदायासाठी योगदान काय आहे? ग्रेस यांच्या कवितेत आणि मुक्ताईच्या अभंगात काय साम्य आहे? प्रज्ञा दया पवार आणि सरिता पत्की यांच्या कवितांतून मुक्ताई कशी भेटते?
जगण्याचे भान: एआय AI च्या युगात संत साहित्याचे 'गुगल मॅप' आपल्याला कसे दिशा देऊ शकते?
लेखिकेचा प्रवास: आकाशवाणीच्या लेखनापासून ते संत साहित्याच्या गाभ्यापर्यंतचा डॉ. रूपाली शिंदेंचा रंजक प्रवास.
डॉ. रूपाली शिंदे यांनी लिहिलेली पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :-
https://granthpremi.com/collections/dr-rupali-shinde
संत ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करणारी अवघी 10 वर्षाची धाकटी मुक्ताई आणि ताटीचे अभंग माहीत नाहीत असा मराठी माणूस विरळाच! मुक्ताबाई, नामदेव महाराज आणि योगी चांगदेव यांच्याही गुरु होत्या. ते सर्व प्रसंग आपण जाणतोच. पण हे प्रसंग केवळ दंतकथा किंवा सिद्धी नाहीत त्यामागे खूप व्यापक आणि सर्व समाजाला उपयोगी असा खोल विचार आहे आणि म्हणून त्या संप्रदायाचे प्रेरणास्थान आहेत. या प्रत्येक कथेतून, मुक्ताबाईंकडून आपण नेमके काय शिकू शकतो? हे आपल्याला सांगताएत प्राध्यापक डॉ. रूपाली शिंदे. पॉडकास्टच्या या पहिल्या भागात आपण खालील मुद्यांवर चर्चा केली आहे:
* भक्ति ही एकट्या व्यक्तीचा उत्कर्ष साधण्यासाठी आहे का ?
* स्त्री मुक्तीचा पासवर्ड म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वरा ?
* मुक्ताबाईंनी वारकरी संप्रदायाला नैतिकता कशी दिली ?
* मुक्ताबाईंचे साहित्य आणि त्यांचे विचार म्हणजे थेरपी आहे का ?
700 वर्षे लोटून गेली तरी "ताटी उघडा ज्ञांनेश्वरा" ची गोडी आजही टिकून आहे आणि मुक्ताबाईंच्या कूट रचना नवीन पिढीला साद घालतात, ते का ? हे जाणून घ्यायचे असेल तर हा एपिसोड नक्की बघा!
डॉ. रूपाली शिंदे यांनी लिहिलेली पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवा
अथवा खालील नंबर वर संपर्क करा
WhatsApp Message Only : +91 85509 31939
स. 10.30 ते स. 6
१९९७ साली, भारतातून, ८ महिलांनी हिमालयाच्या पूर्व टोकापासून ते पश्चिम टोकापर्यंत पायी सफर केली. ४५०० कि मी चा हा प्रवास त्यांनी १९८ दिवसात पूर्ण केला. ही जगातील
पहिली अशी मोहीम होती ज्यामधे अरुणाचल प्रदेश ते लडाख इतका लांबचा पल्ला, जो ३ देशातून आणि ४० हून अधिक मोठ्या खिंडी चढून, फक्त महिलांच्या चमूने पार केला.
विनीता मुनी एक उत्तम mountaineer तर आहेच. पण या मोहिमेत विनीता official फॉटोग्राफर म्हणून सहभागी झाली. आणि त्या अनुभवावर आधारित "Across the Himalaya" हे तिचे पुस्तक काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाले.
कसा होता हा प्रवास ? फक्त बायकांची मोहीम म्हणून काय अडचणी आल्या ? इतक्या मोठ्या मोहिमेत हिमालयाने काय घेतले ? मोहिमे नंतर काय बदल झाले ? काय शिकायला मिळाले ? या सर्व गप्पा तुम्हाला या एपिसोड मध्ये ऐकायला मिळतील. तुम्हाला प्रवास, trekking, mountaineering, Himalaya आणि adventure याची आवड असेल तर हा एपिसोड नक्की ऐका.
In 1997, eight Indian women set out to do something almost no one had imagined—to walk across the entire Himalaya—nearly 4,500 km, 3 countries over 198 days through some of the most remote and breathtaking landscapes on earth. Among them was Vineeta Muni — photographer, mountaineer, and seeker of quiet strength. The book "Across the Himalaya", written by Vineeta, narrates the untold story of this extraordinary journey!
This conversation is not only about adventure. It’s about belief, endurance, fear, friendship, the quiet courage of simply taking the next step and what Himalaya gives you.
If you’ve ever felt drawn to the mountains—even once—this conversation will stay with you!
विनीता मुनी यांनी लिहिलेले Across the Himalaya हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :-
https://granthpremi.com/products/across-the-himalaya-vineeta-muni
हे पुस्तक amazon वरुन मागवण्यासाठी लिंक :
https://amzn.in/d/b5X9Cr8
सर्व जग ज्या योग साधनेला मान्यता देते तिथे आपण भारतीय मात्र योगाकडे काहीसं दुर्लक्ष करतो आणि तथाकथित मॉडर्न आणि महागड्या Zumba / Gym / Pillates च्या मागे धावतो. परदेशामध्ये शालेय शिक्षणात योग अंतर्भूत केला जातोय पण आपल्याकडे मात्र अजूनही त्याबाबतीत औदासिन्य आहे. आपल्याकडे योग म्हणजे योगासने, हे समीकरण अतिशय घट्ट रुजलेले आहे. पण मग योग म्हणजे नेमके काय? बरेच वर्षे योग करणार्या लोकांनाही अष्टांग योग कळत नाही. योग आणि ध्यानाच्या मागचे विज्ञान काय आहे? योगामुळे खरेच वजन कमी होते?
योगामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो? प्राणायामामुळे मन:शांती मिळते? योग आणि अध्यात्म याचाही संबंध आहे, तो कसा? या सर्व विषयांवर या एपिसोडमध्ये आपण गप्पा मारल्या आहेत
श्री अनिल फडणवीस सरांबरोबर. फडणवीस सर संत साहित्य अभ्यासक तर आहेतच पण ते योग अभ्यासक आणि योग शिक्षक देखील आहेत. त्यांच्या "आनंद योग - ध्यानासाहित" या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीच्या निमित्ताने निरंजन मेढेकर यांनी हा संवाद साधला आहे.
अनिल फडणवीस यांनी लिहिलेले आनंद योग पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :-
https://granthpremi.com/products/anand-yog
अथवा खालील नंबर वर संपर्क करा
WhatsApp Message Only : +91 85509 31939
(स. 10.30 ते स. 6)
कवितेची गोडी विद्यार्थ्यांना लागावी म्हणून अनन्वय संस्थेची सुरुवात झाली. हे विद्यार्थी म्हणजे माझा बँक बॅलेन्स आहे असे माधवी ताई म्हणतात. फर्ग्यूसन कॉलेज मध्ये उत्तम काम सुरू असताना माधवी ताई संहिता लेखन आणि माहितीपट या क्षेत्राकडे वळल्या. 50 महितीपट त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी बनवले. त्यामधील कित्येक महितीपटांना राष्ट्रीय आणि आंतर्राष्ट्रीय पारितोषिके मिळाली. या क्षेत्रात कुठलेही शिक्षण न घेता ही किमया त्यांनी कशी साधली? विविध क्षेत्रांमध्ये तितकेच समरसून काम करणे, त्यामध्ये यश मिळवणे, आणि हे करताना आनंदी आणि समाधानी राहणे हे त्यांना कसे जमले? आयुष्याच्या या टप्प्यावरही त्या उपयोजित मराठी हा विषय कॉलेज मध्ये शिकवीत आहेत.. आपल्या मनातून मराठीचा न्यूनगंड आधी गेला पाहिजे , सर्वात आधी आपल्या घरात मराठी वातावरण ठेवणे गरजेचे आहे असे त्यांचे ठाम मत आहे. डॉ. माधवी वैद्य यांच्या मुलाखतीचा हा दुसरा भाग तुम्हाला नवीन दिशा आणि प्रेरणा नक्कीच देवून जाईल.
What if one woman could master literature, theater, medicine, and film all in one lifetime? Meet Dr. Madhavi Vaidya—a Gold Medalist scholar, celebrated author, and passionate teacher who breathed life into Marathi poetry and drama. Her award-winning documentary “It’s Prabhat” earned the coveted President’s Award. But that’s not all—homeopathy started as a hobby and grew into a 35-year healing journey with a unique, holistic approach. Curious how she balanced it all with grace and grit? Tune in to uncover the secrets behind her extraordinary, inspiring life that will leave you motivated and amazed!
डॉ. माधवी वैद्य यांनी लिहिलेली पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :-
https://granthpremi.com/collections/dr-madhavi-vaidya
अथवा खालील नंबर वर संपर्क करा
WhatsApp Message Only : +91 85509 31939
(स. 10.30 ते स. 6)
डॉ. माधवी वैद्य यांची "कवी शब्दांचे ईश्वर" ही दूरदर्शन वर प्रसारित झालेली मालिका पाहण्यासाठी लिंक :- https://www.youtube.com/@aaryacommunicationsvideos1883/videos
१८ व्या वर्षी लग्न झाल्यावर सामान्य मुली हार मानतील पण माधवी ताई हे अजब रसायन आहे, त्यांनी लग्नानंतर शिक्षण (एमए-मराठी) पूर्ण केले, पीएचडी साठी खानोलकरांचे साहित्य या वेगळ्या विषयात गोल्ड मेडल त्यांनी मिळवले, पुढे होमिओपॅथीचा अभ्यास करून त्या प्रॅक्टिस करू लागल्या, जी अजूनही चालू आहे. पुढे फर्ग्यूसन कॉलेज मध्ये मराठी विषयाचे अध्यापन करीत असताना त्यांनी कवितेच्या प्रचार आणि प्रसारासाठी अनन्वय नावाची संस्था सुरू केली, विविध विषयांवर कित्येक चांगली पुस्तके लिहिली. इथेच त्या थांबल्या नाहीत, पुढे माहितीपटांचे संहिता लेखन आणि दिग्दर्शन याकडे त्या वळल्या. त्यांच्या "It's Prabhat" या ह्या प्रभात फिल्म वरच्या माहितीपटाला आणि दिग्दर्शनाकरिता "रजत कमल" हे राष्ट्रपती परितोषिक त्यांना मिळाले.
या पॉडकास्ट एपिसोड मध्ये आपल्या पाहूण्या आहेत जेष्ठ साहित्यिक, अध्यापिका आणि दिग्दर्शिका डॉ. माधवी वैद्य. या पहिल्या भागात त्यांच्या लहानपणापासून ते अनन्वय संस्थेची सुरुवात कशी झाली हा माधवी ताईंचा जीवन प्रवास आपण उलगडणार आहोत. एखाद्याने ठरवले, तर ती व्यक्ती विविध क्षेत्रात फक्त मुशाफिरीच नाही तर प्राविण्यही मिळवू शकते, तेही पूर्ण वेळ नोकरी करता करता, याचे उत्तम उदाहरण म्हणजे माधवी ताईंचे करियर आहे. माधवी ताई त्यांच्या चारही गुरूंचे ऋण मानूनच या गप्पांची सुरुवात करतात. ग्रंथप्रेमी च्या सर्व श्रोत्यांसाठी आणि वाचकांसाठी चुकवू नये असा हा एपिसोड आहे.
कल्याणच्या एका मध्यमवर्गीय घरात वाढलेल्या प्रणवला रुईया कॉलेज मधे admission घेतल्यानंतर प्रचंड न्यूनगंड आला होता. ११ सायन्स नंतर १२ वीला आर्ट्स बदलून घेतल्यावर तो पुढे पत्रकार झाला आणि नंतर तीही नोकरी सोडून फूलटाइम लेखक झाला. या एपिसोड मध्ये आपले पाहुणे आहेत युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक प्रणव सखदेव! काय पहाल या भागात?
* रुईया कॉलेजने काय दिले ?
* पत्रकाराची नोकरी का सोडली? लेखन प्रवास कसं सुरू झाला?
* काळे करडे स्ट्रोक्स वर प्रतिक्रिया आणि टीका
* हरारी , कलाम यासारख्या दिग्गज लेखकांच्या पुस्तकाचे अनुवाद करण्याचा अनुभव कसा होता?
* पुस्तकाचे मार्केटिंग का गरजेचे आहे ?
* सोशल मीडिया वर होणारे लिखाण योग्य आहे का ?
Pranav Sakhdev, award-winning Marathi author and poet, joins us to share his inspiring journey from a modest childhood in Kalyan to literary acclaim. Discover how journalism, college life, and creative discipline shaped his writing, and learn why translation work is transforming Marathi literature. In this candid conversation, Pranav explores balancing creativity with daily life, the evolution of Marathi language, and building connections with readers. Aspiring writers will gain actionable advice on patience, consistency, and finding your voice in today’s digital world. Tune in for fresh insights on modern Marathi literature, storytelling, and the power of perseverance.
लेखक प्रणव सखदेव यांनी लिहिलेली पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :-
https://granthpremi.com/collections/pranav-sakhdeo-books
आजूबाजूला कित्येक मृत्यू होत असताना माणूस मात्र स्वत: अमर असल्याप्रमाणे वागतो. युधिष्ठीराला हे सर्वात मोठे आश्चर्य वाटले.. या भागात संत साहित्य अभ्यासक आणि लेखक श्री अनिल फडणवीस सर, ज्ञानेश्वरीच्या 8 व्या अध्यायाचे गोष्टीरूप निरूपण करीत आहेत. काय पहाल या भागात ?
संत ज्ञानेश्वर महाराज मृत्यू आणि पुनर्जन्माबद्दल काय सांगतात? मृत्यूनंतर सद्गती कशी मिळते ? आजच्या काळातील सर्वसामान्यांना हे का साधले जात नाही ?
मृत्यू संबंधी विज्ञान काय म्हणते ? आपल्याला आणि जवळच्या नातेवाइकाला मृत्यू नंतर सद्यस्थिती कशी प्राप्त होईल ? त्यासाठी काय केले पाहिजे ?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंत्यसमयी त्यांनी काय केले?
पूर्वजन्माचे ज्ञान कोणाला असते ? ज्ञानेश्वरीत आठव्या अध्यायाशिवाय इतर ठिकाणी पण पुनर्जन्माचा उल्लेख आलेला आहे का ? या विषयावर आपल्या संतांनी काय सांगितले आहे?
S*xuality किंवा लैंगिकता हा विषय भारतीय समाजात अजूनही टॅबू मानला जातो, या विषयावर संवाद आणि शिक्षणाची नितांत गरज आहे. या एपिसोड मध्ये आपण चर्चा करतोय
"देहभान" पुस्तकाचे लेखक निरंजन मेढेकर यांच्याशी. सचिन पंडित यांनी हा संवाद साधला आहे. काय पहाल या भागात?
* लैंगिकता शिक्षण / S*x Education - गरज काय आणि ही जबाबदारी कोणाची?
* डेटिंग, विवाहपूर्व संबंध, सहजीवन आणि लैंगिक समस्या..
* संवादाचा अभाव अनेक सामाजिक आणि वैयक्तिक समस्या कश्या निर्माण करतो ?
* P*rn Addiction चे दुष्परिणाम काय आहेत ?
* R*pe Mentality काय आहे ?
* जेष्ठांचे सहजीवन का महत्वाचे आहे ?
लेखक निरंजन मेढेकर यांनी लिहिलेले "देहभान" हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :-
https://granthpremi.com/products/dehbhan-book-by-nirnjan-medhekar
#ग्रंथप्रेमी #मराठीपॉडकास्ट #निरंजनमेढेकर #देहभान #लैंगिकता #मराठीपुस्तक #लैंगिकताशिक्षण #संवादमहत्वाचा
#MarathiPodcast #NiranjanMedhekar #Granthpremi #S*xEducation #WhyConversationMatters #Dehbhaan #MarathiBook
अनुराधा बेनीवाल या हरयाणवी तरुणीने फक्त १ लाखात अख्खं युरोप पालथं घातलं, ते कसं? हे समजून घेण्यासाठी आपण गप्पा मारतोय "माझा ब्रॅंड आजादी" या पुस्तकाच्या लेखिका (मराठी अनुवाद) डॉ. उज्ज्वला बर्वे यांच्याशी. काय आहे या पॉडकास्टमध्ये ?
बजेट ट्रॅव्हलची मजा, काउच सर्फिंग काय असते?
एकटीने फिरणं सेफ आहे.. ?
भारतीय आणि युरोपियन कल्चरमधले गमतीशीर फरक
बायकांचं स्वातंत्र्य आणि प्रवासातून आलेला आत्मविश्वास
आणि या सगळ्यात अस्सल ‘फ्रीडम’चा शोध.
हा पॉडकास्ट ऐकला की आयुष्यातली खरी ‘आजादी’ म्हणजे काय हा विचार तुम्ही जरूर कराल अशी आशा करतो !
Ever wondered if you could travel Europe on a shoestring budget and find true freedom? This podcast dives deep into the incredible journey of a young Haryanvi woman who explored Europe for a month with just one lakh rupees! It's not just a travelogue; it's a powerful story about independence, self-discovery, and breaking societal norms. We explore how she used budget hacks like couch surfing, faced challenges, and found empowerment. Join us as we discuss societal attitudes towards women's freedom, cultural contrasts, and how travel can truly transform you and set you free. Get ready to rethink what 'Azadi' really means!
डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी अनुवाद केलेले "माझा ब्रँड आजादी" हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :-
https://granthpremi.com/products/maza-brand-aazadi
मंडळी, आपल्या भारताची शान म्हणजे इथली मंदिरं! नुसत्या दगडातून साकारलेली ही वास्तूशिल्पं नाहीत, तर आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि अध्यात्माचा तो एक जिवंत ठेवा आहे. 'गाभारा - मंदिरांचा समृद्ध वारसा' या पुस्तकाचे लेखक, श्री. सर्वेश फडणवीस यांच्यासोबतच्या या गप्पांमध्ये आपण याच मंदिरांच्या अद्भुत विश्वात डोकावणार आहोत.
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपासून ते महाराष्ट्र आणि विशेषत: विदर्भातील जुन्या, पण तितक्याच महत्त्वाच्या मंदिरांपर्यंतचा प्रवास आपण करणार आहोत. ही मंदिरं फक्त मूर्ती ठेवण्याची किंवा प्रार्थना करण्याची जागा नव्हे, त्याच्यामागे खोल अध्यात्म दडलेले आहे. ही मंदिरे आणि आपल्या शरीराचे कनेक्शन काय? मंदिरे का पहावीत, त्यांचा नेमका उपयोग काय आणि ती केवळ डोळ्यांनी न पाहता कशी अनुभवायची, हे सर्व आपण सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. तरुण पिढीला आपल्या समृद्ध वारशाची ओळख करून देणारी आणि मंदिरांकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देणारी ही मुलाखत नक्की बघा. हिंदू संस्कृती, अध्यात्म, इतिहास किंवा मराठी साहित्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी ही पर्वणी ठरावी अशी आशा करतो.
Dive deep into the fascinating world of Indian temples with Sarvesh Fadanvis, author of 'Gabhara'. In this exclusive interview, we explore the spiritual, historical, and architectural significance of temples, from the recent Ram Mandir Pran Pratishtha to the ancient sites of Maharashtra and Vidarbha. Discover what temples truly represent, their connection to the human body, and how to experience their hidden power beyond just viewing the idol. This discussion offers a fresh perspective on sacred spaces and India's rich heritage. Perfect for anyone interested in Hindu culture, spirituality, history, or Marathi literature. Don't miss this insightful conversation!
आजच्या धावपळीच्या जगात माणसाकडे पैसा, साधने आणि सुविधा असतानाही, खरे सुख आणि समाधान आहे का? शांती फक्त वृद्धांसाठी गरजेची आहे, की तरुणांना आणि आजच्या पिढीला तिची जास्त गरज आहे? ती मिळवण्याचा सोपा मार्ग कोणता ? माऊलींच्या हरिपाठाचे प्रयोजन काय? संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आजही सर्व पिढ्यांना कसा उपयोगी आहे ? या भागात ऋचा थत्ते यांनी संवाद साधला आहे गोष्टीरूप हरिपाठ पुस्तकाचे लेखक श्री अनिल फडणवीस यांच्याशी! माऊलींचा हरिपाठ, अध्यात्म, ध्यान हा विषय जरी जड वाटला तरी तो सोप्या समजेल अश्या गप्पागोष्टींच्या माध्यमातून सोपा करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. काय पाहाल या भागात?
हरिपाठ आजही relevant का आहे?
संसारात राहून नामसाधना का करावी?
नामसाधनेचा मार्ग सोपा का आहे?
तरुणांसाठी हरिपाठाचे महत्व
हरिपाठातील पहिल्या आणि नवव्या अभंगाचा गूढार्थ
सद् गूरूचे महत्व आणि ध्यानाचे फायदे
द्वैत-अद्वैत म्हणजे काय?
Unlock true happiness and peace in today’s fast-paced world! In this episode, we dive into the big question: Even with money and comforts, do we really feel satisfied? Discover why inner peace isn’t just for the elderly—youth and all generations need it now more than ever. Learn the simple, practical path to lasting fulfillment through Saint Dnyaneshwar Maharaj’s Haripath, explained in an easy, relatable way.
Join Rucha Thatte in conversation with Anil Phadnavis, author of "Goshtiroop Haripath," as they break down spirituality, meditation, and Haripath’s timeless wisdom for everyday life. You’ll find out:
- How Haripath remains relevant today
- Why and how to practice name chanting in daily life
- The power of Haripath for youth and the benefits of focused practice
- The deeper meaning behind the first and ninth abhangas
- The importance of a true Guru, meditation, and understanding duality vs. non-duality
Don’t miss this episode if you want practical tips for inner strength, clarity, and positivity—no matter your age!
वयाच्या ७३ व्या वर्षीही ज्यांच्या पायात ट्रेकिंगची उमेद आणि हातात लेखणीची ताकद आहे, असे दिलीप नाईक निंबाळकर आज आपल्यासोबत आहेत. एक अनुभवी गिर्यारोहक, पुरस्कार विजेते लेखक आणि गिरीप्रेमीचे सह-संस्थापक... त्यांची ओळख एवढीच नाही. या गप्पांमध्ये आपण ऐकणार आहोत त्यांचा डोंगरांपासून सुरू झालेला आणि शब्दांपर्यंत पोहोचलेला विलक्षण प्रवास, गिर्यारोहणाचे अनुभव, त्यातून मिळालेले जीवनविषयक धडे आणि हे अनुभव त्यांनी लेखणीतून कसे गुंफले? आजच्या सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या त्यांच्या कथांमधून रोष का जाणवतो? डोंगर आणि माणसं वाचणारा हा अवलिया आपल्याला नक्कीच प्रेरणा देईल. त्यांचा हा प्रवास आणि विचार ऐकण्यासाठी हा भाग नक्की पहा.
Imagine still trekking, writing, and reading avidly at 73! Meet Dilip Naik Nimbalkar, our incredible guest on this episode.
He's not just an experienced mountaineer who has explored the Himalayas and Sahyadri, but also an award-winning author and co-founder of the renowned Giripremi mountaineering institute in Maharashtra.
In this inspiring chat, Dilip shares his unique journey – how his adventures in the mountains shaped his life and led him to writing. Discover the powerful life lessons learned from trekking and climbing, and how they translate directly into his impactful books and realistic short stories that tackle social issues head-on.
If you're fascinated by mountaineering, the writing process, or simply looking for life inspiration, you don't want to miss this conversation.
बाजीरावांनी सिध्याचा नायनाट कसा केला? थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या राजपुताना भेटीचे महत्व काय? या diplomatic भेटीतून त्यांनी नेमके काय साधले? राधाबाईंची काशीयात्रा कशी सफल झाली? यात्रेसाठी उभ्या हिंदुस्तानातून शत्रूने देखील राधाबाईना संरक्षण का दिले? बाजीरावांनी थेट दिल्लीला धडक दिली आणि बादशाहाचा पराभव कसा केला? बादशहाला हरवले पण दिल्ली घेतली नाही, का ? हे सर्व जाणून घेवूया "देवयोद्धा" या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावरील महाकादंबरीचे लेखक आणि इतिहास अभ्यासक श्री काका विधाते यांच्याकडून, ग्रंथप्रेमी पॉडकास्ट वर, थोरले बाजीराव पेशवे विशेष मालिकेच्या पाचव्या भागात!























