Discover
Life of Stories
Life of Stories
Author: Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Subscribed: 4Played: 12Subscribe
Share
© 2026 Life of Stories
Description
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
1985 Episodes
Reverse
Send a text अभ्यासात असे आढळून आले आहे की त्याच्या निर्मितीमागील टेथिस समुद्र हे आता नामशेष झाले आहे. टेथिस समुद्राच्या मृत्यूनंतर हिंद महासागराचे रहस्यमय गुरुत्वाकर्षण छिद्र तयार झाल्याचे शास्त्रशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. टेथिस समुद्र एकेकाळी पृथ्वीच्या कवचाचा भाग होता, परंतु 180 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवरील गोंडवाना या प्रदेशाच्या विघटनादरम्यान तो युरेशियन प्लेटच्या खाली गाडला गेला होता. अशाप्रकारे पृथ्वीच्या कवचाचे तुकडे या आवरणाखाली बुडाले. गोंडवाना हा एक प्राचीन महाखंड होता, जो १८० दशल...
Send a text एकदा स्वर्गलोकांत ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांचे आपापसात श्रेष्ठ कोण यावरून कडाक्याचे भांडण जुंपले. तत्पूर्वी ब्रह्मदेवाला पाच शिरे होती. या दोघांच्या वादावर शंकरांनी तोडगा काढावा आणि निर्णय घ्यावा, तसेच दोन्ही देवांत ब्रह्मरूप कोणाचे हाही वाद उद्भवला. तेव्हा देवऋषी नारदांनी दोन्ही देवांना बदरीकाश्रमांत जाऊन तेथील महामुनींची भेट घेऊन या शंकेचे निरसन व्हावे यासाठी पाठविले. परंतु शिव हेच ब्रह्मस्वरूप आहेत, असे महामुनींनी सांगितलेले दोन्ही देवांना पटले नाही, मग पुन्हा ते ‘चार वेद’ य...
Send a text आम्ही सर्व उद्योजक आहोत. आम्ही अशी अनेक मशीन्स बघितली आहेत. तेथे गेलो होतो ,त्याला कारण म्हणजे त्या कारखान्याचे वेगळेपण पाहायचे होते. कारण तेथे एकंदर सव्वादोनशे कामगारांपैकी जवळजवळ पासष्ट कामगार गतिमंद होते. त्यांतील काही तर मतिमंद म्हणता येतील असे होते आणि तेच सुभाष चुत्तर यांच्या कारखान्याचे वैशिष्ट्य होते. व्यवस्थापकांनी आम्हाला असेम्ब्ली सेक्शन दाखवला. तेथे ‘फोर्स’ मोटरच्या गाड्यांच्या दरवाज्यांसाठी हिंजेस (बिजागरी) असेम्बल केली जात होती. तेथे तर सर्वच कामगार मतिमंद होते, इतके...
Send a text लग्नानंतर आठ महिन्यांनी अंजलीचा भारतातून अमेरिकेमधे झालेला प्रवास खूप अडथळ्यांचा होता. 21 तासात पूर्ण होणाऱ्या प्रवासासाठी तिला तीन दिवस लागले. ह्या प्रवासात तिला माणुसकीचे अनोखे दर्शन घडले. ऐकूया तिच्या शब्दात तिचा तो 41 वर्षापूर्वीचा परंतु अजूनही ताजा असलेला अनुभव.
Send a text तुम्ही तुमचा सकाळचा कॉफीचा मग कसा उचलता, डाव्या हाताने की उजव्या? आपण अगदी यांत्रिकपणे करतो ही क्रिया.. पण तरीही, कोणी न कोणी हे ठरवत असेलच ना..? मग कोण बरं ठरवतं हे? आजकाल कसं, सगळं अगदी जेनेटिक लेव्हल पर्यंत पाहिलं आणि तपासलं जातं. मग तुमचे जीन्स किती प्रमाणात हे सगळं म्हणजे, डावखुरेपण वगैरे ठरवतात याचा विचारही होऊच शकतो.
Send a text आपल्या लहानपणी पेनमधील शाई संपली की नवी रिफील घ्यायची प्रथा होती. आता तो पेन कचऱ्यात फेकून नवा पेन घ्यायची प्रथा रुजली आहे. आज ही मी जेव्हा पेन च्या रिफिलचा शोध घेत फिरतो तर बहूतांश पेनच्या रिफीलच मिळत नाहीत. कारण तेच. मग दुप्पट किंमतीला विकले जाणारे नवे पेन कोण विकत घेईल ? या "नियोजित अप्रचलन" नावाच्या विकृत व्यापार फंड्यामूळेच.. ‘वापरा आणि फेका’ ... नावाचा 'भस्मासुर' जन्माला आला.
Send a text भवनाथ म्हणजे तलेटी, येथील दुधेश्वर शिवमंदिरापासून प्रदक्षिणेला सुरूवात करतात. गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेऊन त्याला प्रदक्षिणा घालणे यालाच परिक्रमा करणे असे म्हणतात. पुरातन काळापासून सदर परिक्रमा चालू आहे गिरनारच्या भोवतीने पूर्ण जंगल आहे. जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे. वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही; फक्त या परिक्रमेच्या कालावधीत ५ दिवस सर्वांसाठी प्रवेश मिळतो. या जंगलात मुंगी, विंचू या पासून अगदी सिंहा पर्यंत भरपूर प्राणी आहेत, पण या ५ दिवसात हे प्र...
Send a text जेव्हा थ्री गॉर्जेस धरण बांधले गेले तेव्हा यांग्त्झी नदीचे 42 बिलियन टन पाणी त्या धरणाच्या मागे समुद्रसपाटीपासून 175 मीटरपर्यंत अडवले गेले. यामुळे पृथ्वीचा जडत्वाचा क्षण थोडासा बदलला, ज्यामुळे पृथ्वीचं रोटेशन अधिक हळू होतंय. पृथ्वीचे परिभ्रमण कमी झाल्यामुळे, एका दिवसाची वेळ 0.06 मायक्रोसेकंदने वाढली आहे. म्हणजेच दिवस आता काही क्षणांनी मोठा झाला आहे. थ्री गॅार्ज डॅमच्या बांधकामामुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुव देखील आपापल्या ठिकाणाहून प्रत्येकी 2 सेंटीमीटर सरकले आहेत असेही म्हटले ...
Send a text "मी सुंदर आहे का?" हा तिला पडलेला प्रश्न. शाळेतल्या मुलींच्या तोंडून ऐकलेले टोमणे, कुत्सित हसू तिला सांगत होतं, तू सुंदर नाहीस. तीलाही ते पटायला लागलं होतं. आरसा सांगू लागला होता, "ती सुंदर नाही. " अखेर तिनं आईला विचारलं, " मी सुंदर आहे? " आई तिच्या डोक्यावरून हात फि...
Send a text स्त्रीवादी विचारसरणीचा पहिला जाहिर उच्चार झाला तो सन १७९२ मधे मेरी वोल्स्टनक्राफ्ट या तत्त्ववेत्तीने लिहिलेल्या ' A Vindication of the Rights of Woman (1792)' या पुस्तकातून ज्यात तिने स्पष्ट्पणे लिहिले होते की, ' स्त्रीचे शिक्षण आणि घडण मुळातच पुरुषी वर्चस्व जपण्याचा विचार करून केली जाते. त्यामुळे पुरूषांना काय आवडते हे 'संस्कार' या नावाखाली तिच्या मनावर ठसविले जाते, परंतु स्वतःला मनापासून काय आवडते, ते ठरवून निर्णय घेण्याची सोडाच, त्याचा नुसता विचार करण्याची क्षमताही त...
Send a text पप्याचा चिन्मय हा बालमित्र. सध्या बेंगलोरला पायलट म्हणून काम करत असतो. गावाकडे जत्रेसाठी वर्षातून एकदा येतो. “ “अरे विमान चालवणं म्हणजे काय तुला बैलगाडी चालवणे इतका सोपं वाटतं काय?” चिन्मयने विचारले. दोघे पप्या ची बैलगाडी घेऊन रानात निघाले. पण चिन्मयला काही बैलगाडी आणि बैल सांभाळता येईना. त्यांने बैलगाडी डायरेक्ट ओढ्यामध्येच लँड केली. “अरे निर्जीव मशिनी चालवण्या परीस हे जिवंत चित्रा व सांभाळणं लय अवघड असतं बाबा! जीवाला जीव जोडावा लागतंय तवा कुठे जनावर ऐकतय” म्हणत पप्प्...
Send a text मुनेच्या काठी गायी चारताना कृष्ण आणि त्याच्या सवंगड्यांनी एकत्र केलेला “काला” – आणि त्यामागे दडलेली एक सुंदर कृष्णलीला. देवांनीही तो प्रसाद मिळवण्यासाठी किडे-मुंग्या आणि माशांचे रूप का घेतले? आणि काल्याचा प्रसाद खाल्ल्यावर हात धुवू नयेत अशी प्रथा कशी पडली? संतांच्या अभंगातून जपलेली ही कथा आपल्याला एकत्र येण्याची, प्रेमाने वाटून खाण्याची आणि सख्य जपण्याची शिकवण देते. चला, गोपाळकाल्याच्या या रंजक कथेत डोकावूया. ========
Send a text पांडवांचे स्वर्गारोहण उत्तराखंडमधील माना गावाजवळील 'स्वर्गारोहिणी' पर्वतावरून झाल्याचे मानले जाते. जाता जाता वाटेत मेरू पर्वत लागला. तिथून पुढे निघताना द्रौपदीचे देहावसान झाले. भीमाला तिचा विरह असह्य झाला. त्याने युधिष्ठिराला विचारले, “भ्राता, द्रौपदी तर निर्दोष होती. तरी तिला मरण का आले?” युधिष्ठिर म्हणाला, “भीमा, आपण पाच जण तिचे पती होतो खरे. परंतु, द्रौपदीचे सर्वाधिक प्रेम अर्जुनावर होते. हे एक प्रकारचे पाप तिच्या हातून घडले म्हणून ती इथवरच पोहोचू शकली.” पुढील टप...
Send a text ९४८ साल. टोकियोमध्ये युद्धानंतरचा एक ऐतिहासिक खटला चालू होता. जपानच्या नेत्यांवर युद्धगुन्ह्यांचे गंभीर आरोप ठेवले गेले होते . जगातील अकरा देशांतील न्यायाधीश त्या खटल्याचा निकाल देण्यासाठी बसले होते. एकामागोमाग एक न्यायाधीश आरोपींना दोषी ठरवत होते. जणू निकाल आधीच ठरलेला होता. पण त्या वेळी एका भारतीय न्यायाधीशाने शांतपणे वेगळे मत मांडले. ते होते न्यायमूर्ती राधाबिनोद पाल. त्यांनी सांगितले की, "न्याय म्हणजे फक्त शिक्षा देणे नव्हे, तर न्यायाची प्रक्रिया तत्त्वांवर आधारित ...
Send a text ति ज्येष्ठांच्या घरात सामानाने ओथंबून वाहणाऱ्या भिंती आणि माळे पाहिले की, “यांच्या पश्चात हे कोण आणि कधी आवरणार?” या विचाराने मलाच अस्वस्थ व्हायला होतं. मी काय केलं? वाचनाची आवड असल्यामुळे पुस्तकं विकत घेते; पण वाचून झाली की ती लायब्ररीला किंवा मैत्रिणींना देते. उरलेली औषधं केमिस्टकडे परत देते. ही औषधं एखाद्या गरजूंना मोफत द्या, असं त्याला सांगते. वयोमानामुळे साडी नेसणं कठीण झालं, तेव्हा दोन-तीन साड्या ठेवून बाकी देऊन टाकल्या. आता माझ्याकडे मॅचिंग चपला नाहीत, दागिने नाहीत, प...
Send a text गोड शब्द नेहमीच गोड असतात का? कौतुकाच्या शब्दांत लपलेला सापळा कसा जीवघेणा ठरतो, हे सांगणारी ही छोटी पण तीक्ष्ण कथा — “गोड सापळा”. एका चलाख कोल्ह्याने गोड बोलून रचलेला सापळा… आणि त्या गोड बोलण्याला भुलून त्याच्यावर दोनदा विश्वास ठेवणाऱ्या भोळ्या गाढवाची गोष्ट.
Send a text एकदा अंधाराने परमेश्वराकडे तक्रार केली की सूर्याचं माझ्याशी काय वैर आहे, ते मला माहिती नाही. पण, पृथ्वीवरून मला सतत हुसकावत असतो. सूर्य म्हणाला, पण, हा अंधार कोण आहे? तो कसा दिसतो? माझी त्याची काही ओळखही नाही. मी कशाला त्याचा पिच्छा पुरवेन? एकदा त्याची माझी भेट करून दे. या गोष्टीला लाखो वर्षं झाली… पण, सूर्य आणि अंधार यांची समोरासमोर भेट परमेश्वरही करून देऊ शकलेला नाही. त्यामुळे अंधाराच्या तक्रारीचा निवाडा आजवर होऊ शकलेला नाही.
Send a text मि. बर्नार्ड स्वतः सतार प्रेमी होते. पंडीत रविशंकर यांचे निस्सीम चाहते होते.भारतातील वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी सतारी मागवलेल्या होत्या. त्यांना माहीत होते,सतार वाजवणे ही एक कला असली तरी सतार बनवणे ही एक वेगळीच कला आहे. सतार बनवतांना कुशल कारागीर फक्त पंढरपूरचे आणि लखनौचे भोपळेच वापरतात. पंढरपूरच्या भोपळ्यांची साल जाड असते तर लखनौच्या भोपळ्यांची पातळ. सतार बनवणारे कारागीर त्याच्या पसंतीने भोपळे निवडतात. खाण्याच्या भोपळ्यांपेक्षा हे भोपळे वेगळे असतात. चवीला अत्यंत कडू असतात.
Send a text एकदा माझी नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली तेव्हा सर्वांना प्रसादही दिला. सारी आवराआवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी मिळेल?’’ सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढ्यात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !’’ वृद्धेला आनंद झाला. बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली, “पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कु...
Send a text एक दिवस जंगलातल्या तळ्याकाठी बसला असताना त्याला त्या तळ्यात पोहोत असलेला राजहंस दिसला. तो पांढराशुभ्र आणि डौलदार पक्षी पाहून तो थोडा हिरमुसला आणि विचार करू लागला," मी असा काळा कुळकुळीत एकदम आणि हा पक्षी एकदम शुभ्र, खरच हाच जगातला सर्वात सुखी पक्षी असावा, मी उगाचंच मला सुखी समजत होतो " असा विचार करत तो त्या राजहंसाकडे गेला आणि त्याला आपल्या या भावना बोलून दाखवल्या. तो राजहंसही म्हणाला," खरं आहे मित्रा तुझं, मी ही समजत होतो असं, पण एके दिवशी मी एका पोपटाला पाहिलं , मला एक रंग आहे पण...



