Discover"राज"कारण " Rajkaran
"राज"कारण " Rajkaran
Claim Ownership

"राज"कारण " Rajkaran

Author: Sakal Media

Subscribed: 0Played: 8
Share

Description

राजकरण (राजकरण हे एक राजकीय पॉडकास्ट असेल जे ऐतिहासिक घटनांच्या सर्व कथा कव्हर करेल)

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्त प्रकाशक आहे. हे राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि इतर ऑफर करते राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडी.
हे राजकारणी आणि राजकीय प्रेमींमध्ये देखील एक प्रसिद्ध नाव आहे.

हेच कव्हरेज अधिक समग्र बनवण्याच्या दिशेने एक पाऊल टाकत, Srkarnama  लाँच करण्यास उत्सुक आहे "राज'करण": एक पॉडकास्ट ज्यामध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. तेव्हा काय घडलं होतं....काय होती त्या मागची कारणं....राजकारणाचा भूतकाळात घेतलेला धांदोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण....राजकारणाच्या नावाखाली घडलेले गुन्हे आणि बरंच काही....

Rajkaran (Rajkaran will be a political podcast that will cover the stories of historical events)
Sarkarnama is the only leading political news publisher in Maharashtra.
It offers an in-depth analysis of political events, end-to-end coverage of election campaigns, and other important happenings in the political circle. It is a known name among politics and also political aficionados.

Taking a step toward making the coverage more holistic, Sarkarnama is looking forward to launching Rajkaran - a podcast that covers important historical events relating to politics. What exactly happened? What were the exact reasons? What led to the political turmoil? Check out some amazing political tales, conspiracies, defining political moments, unheard stories, political crimes, and more on Sarkanarma's Special Podcast...



Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators.
studio@ideabrews.com

Android | Apple
45 Episodes
Reverse
एकेकाळी दरोडे घालणारे....बंदुकीच्या जोरावर दहशत पसरवणारे हात जलसंधारणाचं काम करायला लागले आणि राजस्थानातल्या त्या परिसराचं रुपडंच पालटलं....एकेकाळी एनकाऊंटरच्या भितीनं लपणारे चेहेरे आता गावातला विकास दाखवायला समोर येतात....या परिवर्तनाची ही कहाणी
पाकिस्तानात इम्रान खान यांची अटक, त्यांना मिळालेला जामीन आणि त्यादरम्यान त्यांच्या समर्थकांनी अगदी लष्कराच्या मुख्यालयावर चाल करण्यापर्यंत घातलेला धुडगूस यानंतर पाकिस्तानमधील राजकारणाची दिशा काय आणि त्या देशाचं भवितव्य काय हा मुद्दा समोर येतोय..याचे पडसाद जागतिक पातळीवर पडणार हे नक्की आहे….
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत हुतात्त्म्यांचं जसं मोठं योगदान होतं…तसंच साहित्यिक आणि शाहिरांचही होतं…आज जाणून घेऊयात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाविषयी…
अबू सालेम, जयपूर, अहमदाबाद दिल्ली बाँबस्फोटांच्या सूत्रधारांमुळे आझमगडचं नाव  एकेकाळी चर्चेत आलं होतं. पण देशविरोधी कारवायांचं केंद्र म्हणून आझमगडला बदनाम करण्यापूर्वी त्याच्या इतिहासात डोकावल्यास वेगळंच सत्य समोर येतं.
देशातील साकारलेला राजकीय भूगोल पाहता विरोधकांचं संपूर्ण ऐक्‍य जवळपास अशक्‍य आहे. काँग्रेसची थेट भाजपशी टक्कर असलेली राज्यं आणि प्रादेशिक पक्षांची ताकद असलेली राज्यं अशी विभागणी करून जमेल तितका समान कार्यक्रम हे विरोधकांना एकत्र आणण्याचं साधन बनू शकतं
लोकसभेच्या निवडणुकांआधी विधानसभेच्या निवडणुकांचा हंगाम सुरू झाला आहे. ईशान्येकडील राज्यांच्या निवडणुकांनी त्याची नांदी झाली. मात्र, देशाच्या राजकारणावर प्रभाव पडेल असं निवडणुकांना सामोरं जाणारं पहिलं राज्य कर्नाटक हे आहे. तिथली निवडणूक जाहीर झाल्यानं राष्ट्रीय राजकारणातील स्पर्धेला उधाण येईल. 
१९ फेब्रुवारी २०२३ ला महाराष्ट्राला स्वतःचं राज्य गीत मिळालं...अंगात चैतन्य फुलवणाऱ्या  या गीताचा इतिहास काय आहे? हे गाणे कोणी लिहले? तसेच हे गीत केव्हा गायले गेले? तसेच या गीताला आत्ता राज्यगीताचा दर्जा का देण्यात आला? याविषीयी सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेऊयात..
भाजपला पर्याय उभा करायचा तर सर्वांनी एकत्र यायला हवं हे सगळे विरोधी पक्ष सांगतात…प्रत्यक्षात मात्र तसं घडताना दिसत नाही….याचा फायदा भाजप उठवणार का हे आगामी लोकसभा निवडणूक ठरवणार आहे….
छगन भुजबळ….आधी शिवसेना, मग काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस..या नेत्याची स्टाईलच हटके…याच हटके स्टाईलमध्ये भुजबळांनी एक आंदोलन केलं ज्याची आठवण आजही काढली जाते. 
बलात्काराबाबतच्या कायद्यात आज अनेक कडक तरतुदी आहेत...या तरतूदी सहजासहजी केल्या गेलेल्या नाहीत...या तरतुदी बदलण्यात कारणीभूत ठरली ती एक अनाथ आदिवासी मुलगी...या मुलीसाठी देशभर छेडल्या गेलेल्या लढ्याची दखल राज्यकर्त्यांना आणि न्यायालयांना घ्यावी लागली आणि त्यातून बलात्कार कायद्यातले बदल अंमलात आले...
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात निर्णायक नसलं तरी एक महत्त्वपूर्ण वळण निवडणूक आयोगाच्या निकालानं आणलं आहे…निवडणूक आयोगानं शिवसेनेचं चिन्ह गोठवून आणखी एक धक्का दिला. त्यावर कळस करणारा निर्णय, शिंदे यांचीच शिवसेना अधिकृत असल्याचा निर्वाळा देऊन निवडणूक आयोगानं दिला आहे, ज्यातून सावरणं उद्धव यांना सोपं नाही
शिया - युक्रेन संघर्षाला आज २४ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण होईल...सरलेलं हे वर्ष केवळ या दोन देशांसाठीच नव्हे तर सर्व जगासाठीच कठीण होतं..... विशेषतः युरोपमधील देशांसाठी.... आज आपण या संघर्षाचा जगावर काय परिणाम झाला याचा आढावा घेणार घेऊया
कारगिलमध्ये घुसखोरी करुन भारतीय भूभाग ताब्यात घेण्याचं शडयंत्र ज्यांनी रचलं होतं ते पाकिस्तानचे लष्करशहा जनरल मुशर्रफ नुकतेच निर्वतले..काय होतं हे व्यक्तिमत्त्व आणि या व्यक्तीमत्त्वाचे भारतीय राजकारणावर काय झाले परिणाम....
काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी 'भारत जोडो' यात्रा काढली.या यात्रेतून काँग्रेसचं गेल्या काही वर्षांत बिघडलेलं गणित सुधारणार का हा प्रश्न विचारला जातोय...राहुल गांधींनी या यात्रेतून काय साधलं आणि भविष्यात त्याचा फायदा काय याचीही चर्चा होतेय....
आगामी मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी (‘वंचित’) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची युती ही एक महत्त्वपूर्ण घडामोड ठरलीये काय होतील याचे राज्याच्या राजकारणावर परिणाम?
बऱ्‍याच वर्षांनंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत खरी निवडणूक झाली….राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार संघटनेच्या अध्यक्षपदी निवडले गेले…त्यानंतर आता या संघटनेकडून अपेक्षा वाढल्या आहेत…  
क्रिकेटसाठी भारतीय वेडे होतात.....आज बीसीसीआय म्हणजेज बोर्ड आॅफ क्रिकेट कंट्रोल इन इंडिया हे जगातलं सर्वात श्रीमंत बोर्ड बनलयं.....हे घडायला प्रमुख कारणीभूत ठरले दोन जण त्यातले एक कोलकत्त्याचे उद्योजक आणि दुसरे एक राजकारणी...जगमोहन दालमिया आणि एनकेपी साळवे हे ते दोन जण......
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद गेली अनेक दशके सुरुच आहे...आता पुन्हा एकदा हा वाद नव्यानं उफाळला आहे....सीमाभागाचा समावेश महाराष्ट्रात व्हावा ही सर्वांचीच भूमिका असली तरी त्यासाठी काही ठोस मानसिकता तयार करण्याची गरज आहे....राजकारणच्या या पाॅडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत याच मानसिकतेबद्दल...  
बिलावल यांनी संयुक्त राष्ट्रसंघात भारताविरुद्ध जो पवित्रा घेतला तो अचानक असण्याची शक्‍यता नाही. त्याचे परिणाम काय याची कल्पना बिलावल यांना किंवा ते प्रतिनिधित्व करत असलेल्या पाकिस्तानच्या सरकारला नाही ही शक्‍यताच नव्हती. शेजारच्या देशाच्या पंतप्रधानांवर अत्यंत खालच्या पातळीवर हल्ला केल्यानंतर उभय देशांत संबंध ताणले जाणार हे स्पष्टच आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात एक असं व्यक्तिमत्त्व होऊन गेलं ज्यानं कायम साधेपणा जपला...सामान्यांसाठी जीव ओतला....त्यांच्या अडीअडचणी जाणल्या आणि सोडवल्याही.... 
loading
Comments (1)

Viju Kumar

It SEEMS that you are on payroll against BJP. असे वाटते की भाजपा विरोधाची ठेकेदारी घेतली आहे. प्रेताला किती ही फुलाने झाकले तरी त्याचा भयाणपणा लपत नाही. काश्मीर, राम मंदिर, तीन तलाक, भारताची सध्याची प्रगती, जगात आताची धमक, उरी स्ट्राइक, balakot bombing etc हे सर्व विसरलायला एक पिढी जावी लागेल. तो पर्यंत करा तमाशा.

Apr 22nd
Reply
Download from Google Play
Download from App Store