Discover"राज"कारण " Rajkaran
"राज"कारण " Rajkaran
Claim Ownership

"राज"कारण " Rajkaran

Author: Sakal Media

Subscribed: 1Played: 10
Share

Description

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे.

ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट,  ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्षण, घडलेले राजकीय गुन्हे आणि बरंच काही...

https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1

Sarkarnama is the only leading political news publisher in Maharashtra.
It offers an in-depth analysis of political events, end-to-end coverage of election campaigns, and other important happenings in the political circle. It is a known name among politics and also political aficionados.

Taking a step toward making the coverage more holistic, Sarkarnama presents " 'Raj'karan" - a podcast that covers important historical political events. What exactly happened? What were the exact reasons? What led to the political turmoil? Check out some amazing political tales, conspiracies, defining political moments, unheard stories, political crimes, and more on Sarkanarma's Special Podcast...

Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators.
studio@ideabrews.com

https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1

Android | Apple
88 Episodes
Reverse
लोकप्रिय नेते सुरेशदादा जैन यांची राजकीय कारकीर्द घरकुळ घोटाळ्यामुळे संपुष्टात आली.
कोरोनाशी दोन हात करतानाही पोळ्यासाठी शेतकऱ्यांनाउस बिलाचा हप्ता वेळेत देण्याची काळजी पंतांनी घेतली होती.
वंदना चव्हाण, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, राजलक्ष्मी भोसले, रजनी त्रिभुवन यांनी महापौरपदाला वेगळा आयाम दिला.
भाजपच्या अमृत पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आपल्या वडिलांना झालेल्या त्रासाची परतफेड करण्यासाठी येवला मतदारसंघात जम बसवण्यास सुरू केली आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.
1999 च्या निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघात माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांची लढत चंद्रकांत खैरे यांच्याशी झाली होती. हा मतदारसंघ शिवसेनचा बालेकिल्ला असला तरी मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. बाहेरुन आलेले अंतुले वरचढ ठरतील अशी भीती काही काँग्रेस नेत्यांना होती.  
संजयकाकांच्या जोडीला कोणीही बडा नेता नसताना आबाविरोधक म्हणून ते राज्यभरात चर्चेत आले. आबांच्या विरोधात मिळत असलेल्या प्रसिद्धीने संपूर्ण राज्याचं लक्ष तासगाव मतदारसंघाकडं लागलं होतं. स्वच्छ प्रतिमा असलेल्या आबांना हिसका दाखवण्यासाठी राज्यातील काही काँग्रेसच्या नेत्यांनी संजयकाकांना रसद पुरवली. त्यामुळं आबा स्वतःच्या मतदारसंघात अडचणीत आले…काय घडलं होतं त्यावेळी !
महाराष्ट्राच्या राजकारणात ५६ वर्षांपासून शिवसेना नावाचे वादळ नेहमीच घोंगावत राहिले. या वादळात अनेकजण तरले तर अनेकजण फसलेही पण शिवसेनेची साथ सोडून घरोबा बदलणाऱ्या भल्याभल्या नेत्यांना या वादळाने घरी बसवून चांगलीच अद्दल घडवली. 
नशिबात नसलं तर समोर आलेलंही हाती लागत नाही असं काहीसं माजी मंत्री सुबोध मोहितेंबाबत झालंय….एक विमान चुकल्यानं त्यांची विधान परिषदेची आमदारकी गेली आणि तेव्हापासून त्यांचं नशिब त्यांना सतत हुलकावण्या देतं….
राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे. इथे कुणी कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कायमचा मित्र नसतो. कोण कधी बाजू बदलेल हे सांगता येत नाही. त्यामुळे उपकार, सहकार्य याला राजकारणात मोठे महत्व असते. दक्षिण कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत असाच एक किस्सा घडला होता. त्याची राज्यभर चर्चा झाली होती.
पुण्याच्या राजकारणातील ‘भाई’ म्हणजेच सुरेश कलमाडी यांना ‘क्लीन बोल्ड’ करणारा नेता ते राजकारणात सक्रिय असेपर्यंत तरी दुसरा कुणी नव्हता. 1995 ते 2007 या काळात काँग्रेसकडं कलमाडींशिवाय दुसरा चेहरा नव्हता. सुरेश कलमाडींची ताकत इतकी होती की त्यांच्या शब्दापलीकडे कुणीही जात नसत. शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवकांचा त्यांच्या समोर थरकाप उडायचा. पण भ्रष्टाचाराचे आरोप झाले अन् भाईंच्या राजकारणाला उतरती कळा लागली
रिक्षा चालवताना जसे गिअर टाकावे लागतात, तसेच समाजकार्यासह राजकारणाचे पैलू अंगिकारत एक एक टप्पा पार करत एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे.
बाळासाहेबांच्या विचारधारेबाबत मतमतांतरे असू शकतात. मात्र बाळासाहेबांनी सत्तेची गंगा सामान्यांच्या दारात पोहोचवली, हे कुणीही नाकारू शकत नाही. काँग्रेसच्या सरंजमी वृत्तीच्या नेत्यांसमोर सामान्यांचे काहीएक चालत नसतानाच्या काळात बाळासाहेबांनी अगदी सामान्यांतील सामान्य लोकांना सत्तेची पदं दिली. त्यांना आमदार, खासदार आणि मंत्री बनवले
देवेंद्र फडणवीस यांनी वॉर्ड अध्यक्ष ते आताचे उपमुख्यमंत्री व्हाया मुख्यमंत्री असा राजकीय प्रवासाचा टप्पा गाठला असला तरी येत्या काळात महाराष्ट्राचा हा राजकीय चाणाक्य आपल्या बुद्धीबळाने कोणाला ‘चेकमेट’ करणार, याबाबत उत्सुकता आहे  
मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आमदार रमेश कदम यांनी मतदारसंघात केलेली कामं.......कदम यांनी निवडून आल्यानंतर विकासकामांचा धडाकाच सुरू केला होता. त्यातूनच त्यांची क्रेझ वाढली. कदमांना तुरुंगात जावं लागलं तरी त्यांची ही क्रेझ कायमच राहीली.
ज्यांच्या राजकारणाचा पिंडचं सहकाराचा होता, अशी कित्येक घराणी आजही राजकारणात सक्रिय आहेत. त्यापैकीच सोलापूर जिल्ह्यातील अकलूजचे मोहिते पाटील हे घराणं, जाणून घेऊयात इथल्या राजकारणाबद्दल
एकेकाळचे कट्टर मित्र असलेले, अनेकांना जेरीस आणलेले सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे आता कट्टर राजकीय शत्रू आहेत. सतेज पाटील आणि महाडिक गटासाठी प्रत्येक निवडणूक हे एक युद्धाप्रमाणे आहे. त्यामुळे राजकारणातून कोण संपणार, कोण तरणार हे येत्या काळात स्पष्ट दिसेल
सतत धावणाऱ्या, अहोरात्र जागणाऱ्या, आणि सतत काही ना काही घडणाऱ्या मुंबईत दोन नावं घेतली, की आजही लोक क्षणभर थबकतात. जुन्या पिढीतल्या लोकांना सगळे संदर्भ आठवतात, आणि नव्या पिढीची उत्कंठा आणखी वाढत जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दाऊद इब्राहिम या दोन ध्रुवांवरच्या दोन माणसांनी त्यावेळी मुंबई व्यापली. तो काळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातही धडकी भरवणारा तुफान वादळी ठरला
सध्या सगळीकडं अमूक नेत्याची ईडीकडून चौकशी झाली....तमूक नेता ईडी कार्यालयात हजर झाला. यांची चौकशी होणार, त्यांच्यावर ईडीने कारवाई केली, असे अनेक शब्द नेहमीच ऐकावयास मिळतात. त्यामुळे नेमकी ईडी म्हणजे काय?, त्याचे कार्य कसे चालते, या बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.
सुशीलकुमार शिंदे यांच्या पहिल्या निवडणुकीवेळी ज्या शरद पवारांनी साथ दिली त्याच शरद पवारांना मला माझ्या शेवटच्या निवडणुकीत साथ द्या म्हणून भावनिक साद घालण्याची वेळ सुशीलकुमार शिंदे यांच्यावर आली. अखेर पराभवाचा ठपका घेऊनच  शिंदे यांच्या राजकारणाला लागलेली घरघर 24 ऑक्टोबर 2023 रोजी निवडणुकीच्या राजकारणातील निवृत्तीच्या घोषणेत परावर्तीत झाली. याद्वारे एका हसतमुख राजकीय व्यक्तीचे राजकारणच जणू थांबल्यासारखे झाले आहे
अजित पवार आणि लोकसभा निवडणूक म्हटली की त्यांचे खासदारकी आठवते. अजित दादा कसे खासदार झाले. हे जाणून घेऊया.
loading
Comments (1)

Viju Kumar

It SEEMS that you are on payroll against BJP. असे वाटते की भाजपा विरोधाची ठेकेदारी घेतली आहे. प्रेताला किती ही फुलाने झाकले तरी त्याचा भयाणपणा लपत नाही. काश्मीर, राम मंदिर, तीन तलाक, भारताची सध्याची प्रगती, जगात आताची धमक, उरी स्ट्राइक, balakot bombing etc हे सर्व विसरलायला एक पिढी जावी लागेल. तो पर्यंत करा तमाशा.

Apr 22nd
Reply
Download from Google Play
Download from App Store